पादचारी पुलाच्या संरक्षणाला तडे
अंबरनाथ, ता. १२ (बातमीदार) : अंबरनाथच्या शिवगंगानगरमधील पादचारी पुलाचे संरक्षक कठडे अनेक ठिकाणी तुटलेल्या अवस्थेत आहे. यात दुर्घटनेची भीती असल्याने संरक्षक कठड्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेवक रवींद्र पाटील यांनी केली आहे.
अंबरनाथला पूर्वेकडील शिवमंदिराकडे जाणाऱ्या; तसेच शिवगंगानगर आणि स्वामी समर्थ चौकाच्या मध्यभागी असलेल्या गोविंद तीर्थ पुलाच्या बाजूला पादचारी पूल आहे. या पुलाच्या बाजूचे लोखंडी संरक्षक कठडे तुटलेल्या अवस्थेत आहेत. शिवगंगानगरमधून पूर्वीच्या सीताराम उद्यानाच्या बाजूने असलेल्या पादचारी पुलावरून नागरिकांसह शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने ये-जा करतात. पावसाळ्यात या ठिकाणी पुलाखालून पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहत जाते. पुलाला संरक्षक कठडे नसल्याने त्या पुलावरून नागरिकांना जाणे धोकादायक झाले आहे. भविष्यात एखादी दुर्घटना होऊ नये, यासाठी पुलाला संरक्षक कठडे त्वरित बसवण्यात यावेत, अशी मागणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.
अंबरनाथ : शिवगंगानगरमधील पादचारी पुलाच्या संरक्षक कठडे तुटलेल्या अवस्थेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.