नागरिक सर्वेक्षणात पालघरकरांनी सहभाग नोंदवावा

नागरिक सर्वेक्षणात पालघरकरांनी सहभाग नोंदवावा

Published on

पालघर, ता. १३ (बातमीदार) : भारत सरकारकडून स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सवानिमित्त देशाला २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ करण्‍याचा संकल्‍प करण्‍यात आला आहे. ‘विकसित महाराष्‍ट्र २०४७’च्या नागरिक सर्वेक्षणात पालघर जिल्ह्यातील नागरिकांनी सहभाग नोंदवण्‍याचे आवाहन जिल्‍हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी केले आहे.

२०२५-२६ पर्यंत भारताची अर्थव्‍यवस्‍था पाच लाख कोटी डॉलरपर्यंत नेण्‍याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे. विकसित भारताचे लक्ष्य साध्‍य करीत असताना राज्‍यांनीसुद्धा २०४७ पर्यंत विकसित होणे गरजेचे आहे. यादृष्‍टीने राज्‍याची अर्थव्‍यवस्‍था २०२७ पर्यंत एक लाख कोटी डॉलर आणि २०४७ पर्यंत ३.५ लाख कोटी डॉलरपर्यंत पोहोचविणे, हे राज्‍याचे मुख्‍य ध्‍येय आहे. मुख्यमंत्र्यांनी भविष्‍यातील वाटचालीसाठी विकसित महाराष्‍ट्र २०४७ च्‍या अनुषंगाने ‘व्हिजन डॉक्युमेंट’ तयार करण्‍यासाठी १५० दिवसांच्‍या कार्यक्रमाची घोषणा केली. त्‍यास अनुसरून विकसित महाराष्‍ट्रचे नागरिक सर्वेक्षण सुरू करण्‍यात आले आहे.

राज्‍यातील नागरिकांची मते, अपेक्षा, अभिप्राय, आकांक्षा व प्राधान्यक्रम जाणून घेण्‍यासाठी नियोजन‍ विभागामार्फत माहिती व जनसंपर्क विभागाच्‍या मदतीने राज्‍यस्‍तरीय सर्वेक्षण अभियान राबविण्‍यात येत आहे. जिल्‍हास्‍तरीय सर्वेक्षणासाठी जिल्‍हाधिकारी कार्यालय व अन्‍य शासकीय कार्यालयांचा सहभाग घेण्‍यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com