विक्रमगडमध्ये लावणीच्या कामाला जोर
विक्रमगड, ता. १२ (बातमीदार) : जूनपासून पावसाने दमदार आगमन झाल्याने विक्रमगड तालुक्यात लावणीच्या कामांना वेग आला आहे.
यंदा बी-बियाणे आणि खते शेतकरीवर्गाला मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाली आहेत. पावसाच्या दमदार आगमनाने शेतकरी सुखावला आहे. आदिवासी शेतकऱ्यांनी पूर्वापार चालत आलेल्या आपल्या रीतीरिवाजाप्रमाणे शेतावरील देवी-देवतांना कोवळी भाजी देऊन लावणीच्या कामांना सुरुवात केली आहे. तालुक्यात १० जुलैपर्यंत विक्रमगडमध्ये ९७५.६ मिमी, तर तलवाडा येथे ९६२.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
तालुक्यातील ८६ गावपाड्यांत ७,५५८ हेक्टर क्षेत्रावर भातशेती करण्यात येते. शेतकरी जया, रत्ना, कोलम, सुवर्णा, कर्जत-३, मसुरी या जातींच्या भाताचे उत्पन्न घेत आहेत. यंदा भात बियाणे, खते व मजुरीचे दर वाढल्याने शेती न परवडणारी झाल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. खते, बियाणे आणि मजुरीस येणारा खर्च उत्पादन केलेला माल विकून वसूल होत नसल्याचेही त्यांनी सांगितले. तालुका कृषी विभागाकडून गावपातळीवर सुधारित शेती करण्याबरोबरच चारसूत्री लागवड करण्याचे आवाहन केले जात आहे. यासाठी कृषी विभागाचे कर्मचारी मार्गदर्शन करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.