गडकिल्ल्यांचा सन्मान ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब
गडकिल्ल्यांचा सन्मान ही
महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भावना
मुंबई, ता. १२ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ ऐतिहासिक किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाल्याबद्दल केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी राज्यातील जनतेचे अभिनंदन केले. ही घटना महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद असल्याचेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार यांच्या प्रयत्नांमुळे हे यश मिळाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या साम्राज्यातून संपूर्ण भारताला एकत्र केले. शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झाल्यामुळे त्यांचे महत्त्व अधिक वाढले आहे. हे किल्ले आता जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतील. प्रेरणा घेण्यासाठी लोक जगभरातून येथे येतील तसेच पर्यटन अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे गोयल म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.