भिवंडीत १२१ सरपंचपदांसाठी पुन्हा सोडत
भिवंडीत १२१ सरपंचपदांसाठी पुन्हा सोडत
भिवंडी, ता. १३ (वार्ताहर) : तालुक्यातील १२१ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण मंगळवारी (ता. १५) शहरातील कामतघर येथील वऱ्हाळदेवी माता मंगल भवनात सकाळी अकरा वाजता काढण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार अभिजित खोले यांनी दिली आहे. तालुक्यातील १२१ ग्रामपंचायतींपैकी ४१ ग्रामपंचायतींचा समावेश अधिसूचित क्षेत्रात आहे. या सर्व ग्रामपंचायतींच्या २०२५ ते २०३० दरम्यान होणाऱ्या सर्वसाधारण निवडणुकीत सरपंचपदाचे आरक्षण या सोडतीत केले जाणार आहे.
ग्रामविकास विभागाने ५ मार्च रोजी सरपंच आरक्षण सोडतीबाबत अध्यादेश जारी केला होता. त्यानुसार राज्यभरात तालुकास्तरावर ही आरक्षण सोडत झाली होती, त्यानुसार भिवंडी तालुक्यातील सरपंच आरक्षण सोडत १३ मे रोजी काढण्यात आली होती. दरम्यान, काही जिल्ह्यांमध्ये आरक्षण सोडतीमध्ये त्रुटी राहिल्याने शासनाने पुन्हा नव्याने आरक्षण सोडत काढण्यासंदर्भात १३ जून रोजी अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार १३ मे रोजीची अधिसूचना रद्द ठरविण्यात आली आहे. त्यामुळे भिवंडी तालुक्यातील सरपंचपदाचे नव्याने प्रवर्गनिहाय आरक्षण सोडत होत आहे. आधीच्या सरपंच आरक्षण सोडतीनंतर अनेकांनी राजकीय मोर्चेबांधणीस सुरुवात केली होती. त्यामुळे आता नव्याने आरक्षण सोडत होत असल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.