सिद्धार्थ बुद्ध विहारात वर्षावास प्रवचन मालिका
सिद्धार्थ बुद्ध विहारात वर्षावास प्रवचन मालिका
कल्याण, ता. १४ (वार्ताहर) : जगभरात आषाढी पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्सवात साजरी केली जाते. तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जीवनात अनेक महत्त्वाच्या घटना याच पौर्णिमेला घडल्या आहेत. आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा असे तीन महिने वर्षावास प्रवचनाची परंपरा बुद्धकाळापासून आहे. त्यामुळे सिद्धार्थ बुद्ध विहार मांडा-टिटवाळा पश्चिम या ठिकाणी बहुजन उत्थान सेवा समिती आणि भारतीय बौद्ध महासभा टिटवाळा विभागातील आंबेडकर नगर शाखा, माता भिमाई शाखा, तक्षशिला शाखा आणि नालंदा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षावास प्रवचन मालिका-२०२५ या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी नालंदा शाखेचे अध्यक्ष संदीप घायवट यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले, तसेच एम. डी. सरोदे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
बहुजन उत्थान सेवा समितीचे अध्यक्ष विजय भोईर, के. एल. उघडे, अशोक जाधव यांनी वर्षावास प्रवचन मालिकेसाठी शुभेच्छा दिल्या. भारतीय बौद्ध महासभा केंद्रीय प्रशिक्षण विभाग उपप्रमुख एम. डी. सरोदे यांनी “आषाढ पौर्णिमा वर्षावासाचे महत्त्व” या विषयावर प्रवचन दिले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक कट्टा, सम्यक संबोधित प्रतिष्ठान व निरनिराळ्या सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक संघटनेचे पदाधिकारी तसेच चारही शाखांचे पदाधिकारी, उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.