महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जपले पर्यावरणाचे भान
वाणगाव (बातमीदार) : सकाळी काम करून रात्री शिक्षणाची वाट धरणाऱ्या मुलांना कुटुंबाची, समाजाची जाणीव असतेच, मात्र पर्यावरणाच्या संरक्षणाबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती होण्यासाठी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. टी. के. टोपे रात्र महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी वृक्षलागवड करून पर्यावरणाचे भान जपले. कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर विद्यार्थ्यांनी रीठा, करंज, जांभूळ, टेटू आदि वृक्षांची लागवड केली. कृषी विद्यालयाचे प्राचार्य प्रसाद कासले यांनी पर्यावरण संरक्षणाविषयी माहिती देऊन वृक्षलागवडीमध्ये देशी झाडांची लागवड करावी, असे सुचविले. यामध्ये रीठा, करंज, टेटू, जांभूळ आदि झाडांचे औषधी उपयोग, आयुर्वेदातील त्यांचे महत्त्व, पर्यावरणीयदृष्ट्या महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. प्रक्षेत्र व्यवस्थापक प्रशांत वरठा यांनी लागवड व त्यांची निगा कशी राखावी, याविषयी माहिती दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.