अंबरनाथमध्ये भरपावसात पाणीबाणी

अंबरनाथमध्ये भरपावसात पाणीबाणी

Published on

अंबरनाथमध्ये भरपावसात पाणीबाणी
महिलांचा आक्रोश मोर्चा

अंबरनाथ ता. १४ (वार्ताहर) : पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले; मात्र तरीही अंबरनाथ शहरात काही भागात पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने महिलांनी संताप व्यक्त केला. चार-चार दिवस रहिवासी सोसायटीमध्ये पाणीच येत नसल्याने संतप्त महिला व भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एमजेपी कार्यालयावर शुक्रवारी (ता. ११) धडक मोर्चा काढला होता.

शहरात उन्हाळ्यात सुरू झालेली पाणीटंचाई अद्यापही कायम आहे. कमी दाबाने पाणी, अनियमित, अनिश्चित व अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे विशेषतः महिलांना घरकाम करताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. घरातील पाण्याची भांडी रिकामी असल्याने काम कधी करणार, नोकरदार महिला कामासाठी बाहेर कधी पडणार, तर मुलांना शाळेत कधी सोडणार अशा अनेक समस्या मांडून महिलांनी संताप व्यक्त केला.

उन्हाळ्यात दिवस आड येणारे पाणी आता पावसाला सुरू होऊनही चार चार दिवस येत नाही. पाणी आले तरी वेळ निश्चित नसल्याने नोकरदार महिलांना हे पाणी मिळत नाही. त्यामुळे महिलांनी आता पाण्यासाठी नोकरी सोडून घरी बसायचा का, असा संतप्त प्रश्न महिलांनी अधिकाऱ्यांना विचारला आहे, तर घरात पाणी नसल्याने महिलांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भेट घेऊन विचारणा केली असता ते मोबाईल खेळण्यात व्यस्त असल्याचेही काही महिलांनी आरोप केले.

फुलेनगर, जावसईनगर, महेंद्रनगर यासारख्या भागात अपुरा आणि अनिश्चित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या परिसरात इमारतीतील नागरिकांनी पाणी मिळत नाही, त्यामुळे एमजेपी कार्यलयावर धडक मोर्चा काढला होता. वारंवार तक्रारी करूनही पाणीप्रश्न सुटत नसल्याने नागरिकांनी मोर्चा तसेच उपोषणाचा इशारा दिला. या वेळी फुलेनगर येथे तीन इंचाची पाइपलाइन असून, यातून फक्त ४५ मिनिटे, तर आठ इंची वाहिनीमधून एक तास पाणीपुरवठा केला जातो. महत्त्वाचे म्हणजे हे पाणी तीन दिवसआड सोडले जात असून, महिन्याच्या बारा दिवसच नागरिकांना पाणी मिळते, असे आरोप या वेळी नागरिकांनी केले, तर उर्वरित दिवस पाणीकपात केली जात असल्याने परिसरातील इमारतीतील रहिवाशांना समाधानकारक पाणी मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी मिळाल्या होत्या.

बैठकीत उडवाउडवीची उत्तरे
तक्रारीच्या अनुषंगाने भाजपचे प्रदेश सचिव गुलाबराव करंजुळे पाटील व कल्याण जिल्हा सचिव अभिजित करंजुळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथ पश्चिम मंडळ अध्यक्ष लक्ष्मण पंत, उपाध्यक्ष शिवशंकर रेड्डी तसेच महिला व नागरिकांनी मजेपी अधिकारी मिलिंद देशपांडे यांच्याशी बैठक घेतली; मात्र या बैठकीतही अधिकाऱ्यांनी चालढकल करत वारंवार वीज खंडित होत असल्याने पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याचे उडवाउडवीचे उत्तर दिले. त्यामुळे ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांचे समाधान झाले नसल्याने नागरिकांनी अधिकाऱ्यांवर रोष व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com