संविधान साक्षरतेशिवाय लोकशाहीचे सक्षमीकरण अशक्य आहे," - ॲड. जयंत जायभावे

संविधान साक्षरतेशिवाय लोकशाहीचे सक्षमीकरण अशक्य आहे," - ॲड. जयंत जायभावे

Published on

‘संविधान साक्षरतेशिवाय लोकशाहीचे सक्षमीकरण अशक्य’
ॲड. जयंत जायभावे यांचे प्रतिपादन
विरार, ता. १४ (बातमीदार) : संविधान साक्षरतेशिवाय लोकशाहीचे सक्षमीकरण अशक्य आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. जयंत जायभावे यांनी सोमवारी (ता. १४) विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयात लोकनेते अण्णासाहेब वर्तक यांच्या ७२व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागातील विद्यार्थ्यांनी गायलेल्या ‘हीच आमुची प्रार्थना’ या गीताने झाली. प्राचार्य डॉ. अरविंद उबाळे यांनी अण्णासाहेब वर्तक यांच्या कार्याचा मागोवा घेत प्रेरणादिनाचे महत्त्व अधोरेखित केले. अण्णासाहेबांनी स्वकर्तृत्वावर ठाणे, वसई आणि पालघर परिसराचा सामाजिक-राजकीय चेहरामोहरा बदलल्याचे नमूद केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विकास वर्तक तर प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. जयंत जायभावे उपस्थित होते. कार्यक्रमात अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाच्या वार्षिक वर्तकाईट अंकाचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी उपाध्यक्ष पांडुरंग नाईक, खजिनदार हसमुखलाल शहा, सदस्य नारायण नाईक, मोहन घरत, हिरेन खोखाणी, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश हिमते, भाऊसाहेब तंत्रनिकेतनचे प्राचार्य नागनाथ कव्हाळे, अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार शेळके, उपप्राचार्या डॉ. दीपा कत्रे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या स्वाती जोशी, पर्यवेक्षक प्रा. हेमंत डोंगरे आदींचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com