वीजपुरवठ्यामध्ये सुधारणा करण्याची मागणी
अंबरनाथ, ता. १४ (बातमीदार) : अंबरनाथमधील वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यात तातडीने सुधारणा करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने अंजी नगरसेवक सुभाष साळुंके यांनी महावितरणच्या कल्याण येथील मुख्य अभियंत्यांकडे केली आहे.
शहरातील वीजपुरवठ्यात व्यत्यय येण्याच्या घटनांमध्ये अनेक महिन्यांपासून वाढ झाली आहे. झाडांच्या फांद्या वीजवाहिनीवर पडणे, रोहित्रे उडणे, वायरी तुटणे, पडघा उपकेंद्रातून भारनियमन आदी अनेक कारणांमुळे वीजपुरवठा अनियमित होत असल्याचे साळुंके यांनी निवेदनाद्वारे लक्ष वेधून घेतले आहे. झाडांच्या फांद्याची वेळेवर छाटणी व्हावी, अपघाताला कारणीभूत ठरणारे धोकादायक विद्युत खांब स्थलांतरित करावेत, वीजवाहिन्या भूमिगत करणे, नागरिकांना विजेबाबत वेळेवर अचूक माहिती मिळण्यासाठी संदेशाद्वारे सूचना देण्याची व्यवस्था करावी, वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी विशेष पथकाची निर्मिती करावी, यांसारख्या मागण्या मुख्य अभियंत्यांकडे करण्यात आल्याचे साळुंके यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.