टोकावडे येथे शेतकरी संघर्ष समितीचे बेमुदत उपोषण
टोकावडे, ता. १४ (बातमीदार) : राष्ट्रीय महामार्ग ६१वर कल्याण-माळशेज घाट रस्त्याच्या रुंदीकरणासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेत शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने टोकावडे नाका येथे सोमवारी (ता. १४) बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले.
शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रकाश पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पवार, रमेश हिंदुराव, सुहास पवार, वसंत देशमुख, रोहित बोराडे, विशाल घरत आदींच्या नेतृत्वाखाली तिवारपाडा, मानिवली, टोकावडे, बोराडपाडा, तळवली, वैशाखरे, मोरोशी, फांगुळगाव या गावांतील बाधित शेतकरी उपोषणात सहभागी झाले आहेत. सरकारने २०१३च्या अधिनियमानुसार योग्य अधिसूचना व मोबदला दिल्याशिवाय जमिनीचा ताबा घेणे बेकायदा असल्याचे समितीचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांच्या या उपोषणाला ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार, पंचायत समिती माजी उपसभापती भगवान भला, अरुणा खाकर आदींनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. उपोषणाद्वारेे शेतकऱ्यांनी संघर्षाची भूमिका घेतल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
राष्ट्रीय महामार्ग ६१ रुंदीकरणाला आमचा विरोध नाही; मात्र प्रशासन व सरकारने रीतसर २०१३च्या कलम २३ नुसार निर्णयाची कार्यवाही करून बाधित व भूसंपादित शेतकऱ्यांना त्यांचा जमिनीचा योग्य मोबदला द्यावा.
- प्रकाश पवार,अध्यक्ष, शेतकरी संघर्ष समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.