दीड तासांत रस्ते पाण्याखाली
घाटकोपर, ता. १५ (बातमीदार)ः मुंबईत बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली. पूर्व उपनगरांना सकाळपासून पावसाने झोडपले. घाटकोपर येथील माता रमाबाई आंबेडकरनगरातील सर्व रस्ते केवळ दीड तासाच्या पावसाने तुडुंब भरल्याने नागरिकांची गैरसोय झाली.
सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने अनेक ठिकाणी पाणी घरात घुसले. तर शाळेतून घरी येणाऱ्या मुलांचे आणि पालकांचे प्रचंड हाल झाले. येथील डी. बी. पवार चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. बाबासाहेबांचा पुतळा परिसरातही पाणी तुंबून तेथे तळे साचले होते. रहदारीच्या रस्त्यांवरील दुकाने आणि घरात पाणी भरल्याने अनेकांची तारांबळ उडाली. रस्त्यांवर पाणी भरल्याने भटक्या कुत्र्यांनी काही एटीएम सेंटरचा ताबा घेतल्याचे दिसून आले. त्यामुळे एकीकडे पावसाने हजेरी लावली ही सुखावह बाब असली तरी पाणी तुंबल्याने पालिकेच्या कारभाराचादेखील भांडाफोड झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.