नवी मुंबईत शुक्रवारी पाणी बंद

नवी मुंबईत शुक्रवारी पाणी बंद

Published on

तुर्भे, ता. १५ (बातमीदार) : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाीला जलवाहिनीला सीवूड सेक्टर-४६ येथे गळती लागली आहे. त्यामुळे या ठिकाणी नवीन जलवाहिनी टाकण्यात आली आहे. ही नवीन जलवाहिनी जुन्या जलवाहिनीला जोडण्याचे काम शुक्रवारी (ता. १८) हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळी १० ते शनिवारी (ता. १९) पहाटे ४ पर्यंत मुख्य जलवाहिनीतून होणारा पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली तसेच कामोठे व खारघर या विभागात जवळपास १८ तास पाणीपुरवठा होणार नाही. दुरुस्ती कामानंतरही शनिवारी सायंकाळपर्यंत शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. त्यामुळे नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी या कालावधीत पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com