उल्हास नदीत महिलेचा मृतदेह आढळला
उल्हास नदीत महिलेची आत्महत्या
कर्जत, ता. १५ (बातमीदार) : उल्हास नदीत विनया आदित्य कालुंके (वय ५०, रा. कर्जत) या महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली. नदीकिनाऱ्यावरील पोसरी गावाजवळ मंगळवारी (ता. १५) त्यांचा मृतदेह पाण्यात वाहून आलेल्या अवस्थेत स्थानिकांना आढळून आला. या प्रकरणी पोलिस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे.
त्या सोमवारी (ता. १४) घराबाहेर गेल्यानंतर परत न आल्यामुळे कुटुंबीयांनी मंगळवारी कर्जत पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. मृत महिलेमागे त्यांचे पती आणि मुलगा असा परिवार आहे. महिला मानसिकदृष्ट्या कमजोर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून त्यामुळेच त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
स्थानिक नागरिकांच्या ही घटना लक्षात येताच त्यांनी तत्काळ कर्जत पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. मृतदेह नेमका कसा आणि कुठून वाहत आला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.