देहर्जे नदीवरील पूल धोकादायक
विक्रमगड, ता. १६ (बातमीदार) : तालुक्यातील शिळ-देहर्जे गावादरम्यान असलेला देहर्जे नदीवरील पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला असून अपघाताला निमंत्रण देत आहे. एखादा अपघात घडल्यास प्रशासनाला जाग येईल का, असा प्रश्न येथून प्रवास करणारे ग्रामस्थ विचारत आहेत.
विक्रमगड तालुक्यातील अनेक गावांना जोडणारा आणि ग्रामीण भागातील महत्त्वाचा असणारा शिळ-देहर्जे गावादरम्यान देहर्जे नदीवर असणाऱ्या पुलाची उंची कमी आहे. परिणामी, जास्त पाऊस झाला, की या पुलावरून पाणी जात असल्याने हा रस्ता बंद असतो. त्यामुळे अनेक गावांमधील नागरिकांना फेऱ्याने प्रवास करावा लागतो. त्यातच झालेल्या पावसाने पुराच्या पाण्याने या पुलाची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी हा पूल दबला आहे. मागील अनेक वर्षे नदीला येणाऱ्या पुराच्या पाण्याचा मार खाऊन हा पूल कमकुवत बनला आहे. भविष्यात हा पूल कधीही पुराच्या पाण्यात वाहून जाऊ शकतो, अशी शक्यता निर्माण झाली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
खासदार डॉ. हेमंत सवरा आणि आमदार हरिश्चंद्र भोये यांनी या पुलाकडे गांभीर्याने लक्ष देऊन उंची असलेला नवीन पूल मंजूर करून बांधून द्यावा, अशी मागणी शिळ, देहर्जे आणि आजूबाजूच्या गावपाड्यांतील नागरिकांकडून होत आहे.
देहर्जे नदीवरील पूल अत्यंत धोकादायक बनला असून कधीही कोसळून पडू शकतो, अशी अवस्था या पुलाची झाली आहे. एखादा मोठा अपघात होण्याआधी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने तत्काळ लक्ष देऊन येथे नवीन पूल बांधावा.
- योगेश पाटील, सामाजिक कार्यकर्ता, देहर्जे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.