दुकानदारांच्या अतिक्रमणावर दुर्लक्ष
दुकानदारांच्या अतिक्रमणावर दुर्लक्ष
कल्याण, ता. १६ (वार्ताहर) : मेट्रोच्या कामामुळे आधीच प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. त्यात के. सी. गांधी शाळेपासून ते टेकडी कब्रस्तानपर्यंत रस्त्यावरील पदपथांवर व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यांनी बेकायदा लोखंडी खांब बसवून चालण्याचा मार्ग अडवला आहे. तसेच येण्या-जाण्याच्या पदपथांवर अतिक्रमण केल्याने रस्त्यावर सुरक्षितपणे चालताही येत नाही. प्रशासनाने या अतिक्रमण करणाऱ्या दुकानदारांवर त्वरित आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) वल्ली राजन यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या दुकानदारांनी पदपथांवर अतिक्रमण केले आहे. बेकायदा लोखंडी खांब बसवत दुकानासमोर आलिशान गार्डन तयार केले आहे. मेट्रोच्या कामासाठी आधीच परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे, तर नागरिकांना पदपथांवर चालणे शक्य होत नाही. काही वाहनचालक पेट्रोलपंपावर नो एन्ट्रीत प्रवेश करतात. तसेच दुकानदार त्यांची दुचाकी वाहने सर्रासपणे पदपथांवर उभी करतात.
आंदोलनाचा इशारा
महापालिका आयुक्त अभिनव गोयल व संबंधित अधिकाऱ्यांकडे काही नागरिकांनी लेखी तक्रारीही केल्या आहे; मात्र वाहतूक पोलिस व महापालिकेचे अधिकारी याकडे जाणवीपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. शहरात प्रमुख ठिकाणी मेट्रोचे प्रकल्प सुरू आहेत. त्यात महापालिकेचे नियोजन नसल्याने नागरिकांमध्ये मोठी नाराजी पसरत आहे. महापालिकेने पदपथांवर अतिक्रमण करणाऱ्या स्थानिक दुकानदारांवर कडक कारवाई करावी, तसेच पदपथे अतिक्रमणमुक्त करावेत अन्यथा महापालिकेच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिल्याचे वल्ली राजन यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.