दीड लाख गोविंदांना विमा कवच द्या
आता दीड लाख गोविंदांना विमाकवच
मुख्यमंत्र्यांचे क्रीडा विभागाला निर्देश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : गोविंदांना सरकारकडून मिळणाऱ्या विमाकवचात वाढ करून ते दीड लाख गोविंदांना देण्यात यावे, अशी मागणी करीत आज दहीहंडी समन्वय समितीने मंत्री ॲड. आशीष शेलार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनीही सकारात्मकता दाखवत याबाबत क्रीडा विभागाला निर्देश दिले आहेत.
राज्य सरकारने दहीहंडी या खेळाला साहसी दर्जा दिल्यापासून या खेळात गोविंदा पथकांचा सहभाग वाढला आहे आणि त्याचबरोबर खेळात सहभागी होणाऱ्या गोविंदांचा धोकाही वाढलेला आहे. सरकारने गेल्या दोन वर्षांपासून ७५ हजार गोविंदांसाठी विमाकवच देण्याचा निर्णय घेतलेला आहे. यंदा यामध्ये वाढ करून एक लाख ५० हजार गोविंदांना विमाकवच मिळावे, अशी मागणी करीत शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. याबाबत क्रीडा विभागाला मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत.
शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकृष्ण पडेलकर, गीता झगडे आणि पदाधिकारी सहभागी झाले होते. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल मंत्री आशीष शेलार यांनी त्यांचे आभार मानले.
विम्याचे संरक्षण
गोविंदाचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास १० लाख रुपये, अपघातग्रस्त असेल तर पाच लाख, अडिच लाख किंवा किरकोळ जखमी असेल तर एक लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे.
----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.