पाणीपुरवठा योजनांच्या अहवाल द्या

पाणीपुरवठा योजनांच्या अहवाल द्या

Published on

विरार, ता. १९ (बातमीदार) : बोईसर मतदारसंघातील ग्रामीण भागात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणअंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांच्या अत्यंत संथ आणि निकृष्ट अंमलबजावणीबाबत माजी आमदार राजेश पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले होते. तिल्हेर व इतर १२ गावे, केळवे-माहीम व इतर १८ गावे, खानिवडे, गारगाव व इतर २२ गावे, तसेच सफाळे-नंदाडे या महत्त्वाच्या पाणी योजनांमध्ये होणाऱ्या अनियमितता, संथ प्रगती आणि दर्जेदार कामाच्या अभावावर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. या निवेदनाची दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ठाणे विभागाला तातडीने कारवाईचे निर्देश दिले आहेत.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ठाणे यांंचे मुख्य अभियंता यांना आठ दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश सरकारकडून देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर माजी आमदार पाटील यांनी समाधान व्यक्त केले आहे. हा निर्णय ग्रामीण जनतेसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, या योजनांच्या पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण अंमलबजावणीला गती मिळेल, अशी अपेक्षा आहे. तसेच दोषींवर कारवाई व्हावी आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटावा, हीच जनतेची मागणी आहे, असे पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com