पालघरमधील ग्रामपंचायतींची झाडाझडती
पालघरमधील ग्रामपंचायतींची झाडाझडती
त्रुटी आढळल्यास संबंधितांवर होणार कारवाई
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २१ : जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा विकास करण्याची जबाबदारी व तेथील नागरिकांना सोयीसुविधा पुरविण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींवर आहे; मात्र अनेकदा ग्रामपंचायती त्यांचे दफ्तर परिपूर्ण न ठेवणे, योजनांची अंमलबजावणी न करणे आदी त्रुटी आढळून येतात. गावपातळीवरील नागरिकांना योजनांपासून व सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याची गंभीर बाब आता समोर आली आहे. याची दाखल घेत, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी ग्रामपंचायतींची झाडाझडती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून या तपासणीत त्रुटी आढळून आल्यास संबंधितांवर योग्य ती कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गुरुवारी दौऱ्यादरम्यान, अचानक काही ग्रामपंचायतींना भेट दिली. त्या वेळी तपासणी करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या. याची गंभीर दखल घेत १५० दिवसांची कार्यालयीन विशेष मोहीमअंतर्गत ग्रामपंचायतींची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
तपासणी मोहिमेसंदर्भात कोणतीही चालढकल करू नये, तसेच तपासणीच्या दिवशी ग्रामपंचायतींचे अभिलेखे तपासनीस उपलब्ध करून दिले नाही. तपासणीत त्रुटी आढळून आल्यास संबंधितांवर योग्य ती कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
---------------------------------
तपासणी मोहीम
ग्रामपंचायतींचे आर्थिक व प्रशासकीय काम पूर्ण करून घेणे, त्याची कार्यवाही करणे, योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे की नाही, याची तपासणी मोहीम २८ जुलै ते ११ ऑगस्ट या कालावधीमध्ये ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड व शहापूर पंचायत समितीच्या अंतर्गत सर्व ग्रामपंचायतींची तपासणी करण्यात येणार आहे.
---------------------------------
पंधरा दिवसांत अहवाल
कोणत्या ग्रामपंचायती तपासणी कार्यक्रम जोडला असून प्रस्तावित तपासणी त्यांना नेमून दिलेल्या ग्रामपंचायतींची तपासणी संबंधित करतील. सर्व अधिकारी यांनी प्रमाणपत्रात नमूद ग्रामपंचायतींची सखोल तपासणी करून आवश्यक त्या शिफारशींसह अहवाल तयार करून १५ दिवसांच्या आत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे यांच्याकडे सादर करावा लागणार आहे.
-----------------------------------
हे करणार तपासणी
मुख्य कार्यकारी अधिकारी व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत), सर्व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी, सर्व विस्तार अधिकारी (पं.) यांचे पथक असणार आहे.
..............................
ग्रामसेवकांवर कारवाई
स्थानिक पातळीवर गावांचा विकास व्हावा, यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून मिळणारा निधी आता थेट ग्रामपंचायतींच्या खात्यावर वर्ग केला जात आहे. या निधीतून गावांचा विकास करण्यात येत असतो. यासाठी ग्रामपंचायत स्तरावर सरपंच आणि ग्रामसेवक बैठक घेऊन ठरावदेखील करण्यात येत असतात, असे असतानादेखील अनेक गावांत ग्रामसेवक हजर राहत नसल्याच्या तक्रारी सातत्याने वाढत असल्याने त्याचा परिणाम विकासकामांवर होत आहे. त्यामुळे ग्रामसेवकांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.