सहा महिन्यांत सात हजार वाहनांवर कारवाई
तुर्भे, ता. २३ (बातमीदार) : एपीएमसी बाजार समितीसह तुर्भे विभागात बेशिस्तपणे वाहने उभी करणारे तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. सहा महिन्यांत सहा हजार ९३३ वाहनचालकांवर कारवाई करीत तब्बल ५९ लाख ३३ हजार ३५० इतका दंड वसूल केला आहे. तर १८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
एपीएमसी वाहतूक विभागाकडून तुर्भे आणि एपीएमसी परिसरात रहदारीस अडथळा करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे. बाजार परिसरातील पदपथावर बेशिस्त तसेच दुहेरी पार्किंग करून कोंडी करणाऱ्या वाहनांवरही कारवाई करण्यात आली. सेक्टर २१ तुर्भे येथील कांदा-बटाटा बाजारातील पदपथावर नेहमीच दुचाकी उभ्या असतात. अन्नपूर्णा बिल्डिंग ते कांदा-बटाटा बाजारातील प्रवेशद्वाराजवळील पदपथ फेरीवाल्यांनी बळकावला आहे.
वाशी-तुर्भे लिंक रस्त्यालगतच्या दुकानासमोरच्या रस्त्यावरच गॅरेज थाटण्यात आले असून दुचाकी, चारचाकी दुरुस्ती केली जाते. वाशीकडे जाणारी एक मार्गिका गॅरेजवाल्यांनी व्यापल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. अशीच परिस्थिती तुर्भे गाव, एपीएमसी जलाराम मार्केट, तुर्भे नाका जनता मार्केट आदी ठिकाणी दिसून येते.
विनाअडथळा प्रवास
वाहनचालकांनी नियमांचे पालन केले तर कारवाईची गरज नाही. शिवाय, सर्वांना विनाअडथळा सुरळीत प्रवास शक्य आहे; मात्र तसे न केल्याने दंडात्मक कारवाई करावी लागत असल्याचे एपीएमसी वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी भांडवलकर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.