मुलांच्या अपहरणाचा डाव उधळला

मुलांच्या अपहरणाचा डाव उधळला

Published on

मुलांच्या अपहरणाचा डाव उधळला

बोळिंज, ता. २२ (बातमीदार) ः वसईमध्ये तृतीयपंथींच्या वेषात तिघांनी मुलींना पळवण्याचा प्रयत्न केल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी त्यांना चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. वसई पोलिस अधिक तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शाळकरी मुलींचे अपहरण करण्याचा डाव गावकऱ्यांनी उधळवून लावला. ही घटना वसई पश्चिमेच्या खोचिवडे गावातील कुरणवाडी इथे घडली. गावातल्या मुख्य रस्त्यालगत चालत जाणाऱ्या तीन मुलींचे आणि एका मुलाचे अपहरण करण्याच्या प्रयत्न करण्यात आला, असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. तृतीयपंथींचा वेश घेऊन काही जण गावात आले होते. त्यांच्यासोबत एक रिक्षाचालकही होता. मुलांना चाकूचा धाक दाखवण्यात आला. शिवाय रस्त्यात अडवून पळवण्याचा प्रयत्न केला. मुलांनी आरडाओरडा केल्याने गावकरी सावध झाले. त्यांनी त्या मुलांच्या दिशेने धाव घेतली आणि त्या तीन जणांच्या तावडीतून त्या लहान मुलींची सुटका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com