जलजीवनच्या देयकांसाठी कंत्राटदारांचा मोर्चा
जल जीवनच्या देयकांसाठी कंत्राटदारांचा मोर्चा
ठाणे, ता. २२ : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदारांची हजारो कोटींची बिले थकीत असताना आता ठाणे जिल्ह्यात जल जीवन मिशनअंतर्गत कंत्राटदारांनी केलेल्या कामांची देयके त्यांना अद्याप दिली नाहीत. ही देयके तत्काळ अदा करावीत, या मागणीसाठी राज्य कंत्राटदार महासंघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मंगेश आवळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी (ता. २२) मोर्चा काढण्यात आला.
राज्य शासनाच्या विविध योजनांतर्गत राज्यातील कंत्राटदार कामे करीत असतात. त्यांची सुमारे ९० हजार कोटी रुपयांची देयके रखडली आहेत. ही देयके अदा करण्यासाठी राज्य कंत्राटदार महासंघाचा संघर्ष सुरू आहे. आता या देयकांमध्ये जल जीवन मिशनच्या देयकांचाही समावेश झाला आहे. ही देयके तत्काळ देण्यात यावीत, यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी मोर्चेकऱ्यांनी शासनाचा निषेध केला. तसेच हातात फलक घेऊन शेतकऱ्यांप्रमाणे आम्हीही आत्महत्या करायच्या का, असा सवाल उपस्थित केला. याप्रसंगी मंगेश आवळे म्हणाले, की आमचे पैसे मिळविण्यासाठी आम्ही गेल्या दोन वर्षांपासून संघर्ष करीत आहोत. ठाणे जिल्ह्यात जल जीवन योजनेंतर्गत ७४० कामे करण्यात आली. ७४० गावांतील घराघरात कंत्राटदारांनी पाणी पोहोचविले आहे. ही योजना राज्य आणि केंद्र सरकारकडून राबविण्यात येत आहे. आम्ही वर्षभर काम केल्यानंतर केंद्राने हात वर केले आहेत, तर राज्य सरकार काहीही भाष्य करायला तयार नाही. आम्ही अनेकदा निवेदने दिली आहेत; मात्र त्यावर काहीच कार्यवाही होत नाही. त्यामुळेच आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. या आंदोलनात कल्पेश केणी, भगवान भोईर आदी सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.