शुक्रवारी पाणी नाही
भाईंदर (बातमीदार) : शहाड येथील अशुद्ध जल उदंचन केंद्रावर वीज मीटर बदलण्याचे काम व जलवाहिनीला होत असलेली गळती बंद करण्याचे काम करणे आवश्यक असल्याने मिरा-भाईंदरला पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम प्राधिकरणामार्फत शुक्रवारी (ता. २५) शटडाऊन घेण्यात आला आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळी नऊ ते शनिवारी (ता. २६) सकाळी नऊ वाजेपर्यंत २४ तासांसाठी शहराला होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. या वेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा सुरू राहणार आहे. स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा पूर्ववत होईपर्यंत मिरा-भाईंदर शहराला पाणीपुरवठा कमी दाबाने व उशिराने होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.