विक्रमगड-तलवाडा रस्ता जीवघेणा

विक्रमगड-तलवाडा रस्ता जीवघेणा

Published on

विक्रमगड, ता. २३ (बातमीदार) : शहरापासून चारोटीकडे जाणाऱ्या तलवाडा-विक्रमगड या रस्त्याची गेल्या वर्षभरापासून दुरवस्था झाली आहे. हा रस्ता अगोदरच अरुंद असल्याने वाहनचालकांचे अपघात होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. १८ किमी अंतर पार करण्यासाठी अर्धा तासाचा रस्ता दीड तासाचा वेळ लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने हा रस्ता जीवघेणा बनला आहे. त्यामुळे रस्त्याचे काम बांधकाम विभागाने लागलीच हाती घेण्याची मागणी येथील वाहनचालक व ग्रामस्थ करीत आहेत.

विक्रमगड शहरापासून १८ किमी अंतरावर तलवाडा गाव आहे. त्यानंतर डहाणू, कासा आणि चारोटीकडे हा रस्ता जातो. त्यामुळे चारोटी येथील महालक्ष्मी मंदिर, डहाणू समुद्रकिनारा असल्याने या रस्त्यावर वाहनांची मोठी रहदारी आहे. पावसाळ्यात जोरदार पावसाचा मारा, तसेच अवजड वाहनांची रेलचेल असल्याने रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. रस्यावरील खडी, डांबर निघून मोठे खड्डे पडल्याने रस्ताच अस्तित्वात राहिलेला नाही, तर रस्त्याखालील जमीन दिसत आहे. रस्त्यावर चिखल असल्याने दुचाकीस्वारांना या रस्त्याचा प्रवास नको वाटतो. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने चिखल उडतो, मात्र संबंधित बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्यामुळे या रस्त्यांची ना डागडुजी ना नवीन रस्ता होत असल्याने पूर्णपणे वाताहत झाली आहे. या खडतर रस्त्यावरून वाहने चालविताना चालकांना जीव मुठीत घेऊन जावे लागते.

रस्ता खराब असल्याने लहान वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे येथे येण्यास ते शक्यतो टाळाटाळ करीत आहेत. १८ किमीचा चांगला रस्ता असल्यास वाहनाला २० मिनिटे लागतात, मात्र हा सध्या दीड तासाचा प्रवास झाला आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने केवळ खड्डे न भरता पूर्ण रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com