भातसाचे तीन दरवाजे उघडले

भातसाचे तीन दरवाजे उघडले

Published on

भातसाचे तीन दरवाजे उघडले
शहापूर, ता. २४ (वार्ताहर) : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरण क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर सुरू आहे. बुधवारी (ता. २३) सकाळी १० वाजता दोन तर दुपारी तीन वाजता एक दरवाजा याप्रमाणे धरणाचे तीन दरवाजे ०.२५ मीटरने उघडण्यात आले. धरणातून सध्या १,२७८.४० क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. भातसा धरणाच्या जलग्रहण क्षेत्रात व लाभक्षेत्रात सतत पाऊस कोसळत आहे. आतापर्यंत हंगामातील एकूण पावसाची नोंद १,६२१ मिमी झाली आहे. सध्या धरणाची पाणीपातळी १३८. मीटरवर पोहोचली आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता विनोद कंक यांनी दिली.

पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने भातसा धरणाच्या परिसरातील तसेच भातसा नदीच्या काठावरील गावांना, विशेषतः शहापूर–मुरबाड रस्त्यावरील सापगाव, खुटघर, कासगांव, खरीवली, तुते, अर्जुनली, काळ्याचा पाडा परिसरातील गावांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाकडून नागरिकांनी नदीच्या काठावर जाऊ नये, पुलावर गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, दरवर्षीप्रमाणे बुधवारी आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते सपत्निक भातसा धरण क्षेत्रात विधिवत जलपूजन करण्यात आले. या वेळी जलसंपदा विभागातील अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com