रक्षाबंधनात पर्यावरण रक्षणाचा संदेश
रक्षाबंधनात पर्यावरण रक्षणाचा संदेश
बाजारात ‘बीज राखी’ला पसंती
तुर्भे, ता. २४ (बातमीदार) : रक्षाबंधनासारख्या पवित्र सणाच्या निमित्ताने प्रकृती आणि पर्यावरणाचेही रक्षण व्हावे, या उद्देशाने प्रभात सामाजिक संस्थेने पर्यावरणपूरक ‘बीज राखी’ बाजारात आणली आहे. या राखीमुळे केवळ बंधन नव्हे तर निसर्ग संवर्धन आणि महिला सक्षमीकरण या त्रिसूत्रीचा उद्देश साध्य होणार आहे, शिवाय या राख्यांना चांगली पसंती मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरवर्षी बाजारात प्लॅस्टिकपासून बनवलेल्या आकर्षक राख्यांचा सुळसुळाट असतो, मात्र या राख्या सणानंतर कचऱ्यात जातात आणि निसर्गाचे मोठे नुकसान करतात. याच समस्येवर उपाय म्हणून घणसोली येथील प्रभात ट्रस्टने बीज राखीची संकल्पना पुढे आणली आहे. ‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत प्रभात ट्रस्टचा हा चौथ्यांदा उपक्रम असून, यात वापरलेले सर्व साहित्य पर्यावरणपूरक आहे. लाल माती, शेणखत, विघटनशील कापडी लेस, रेशमी धागा अशा घटकांपासून तयार झालेल्या या राख्यांमध्ये निलगिरी व बाभळीच्या बिया टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे राखी सणानंतर जमीनीवर टाकली तरी त्यातून नवीन रोपे उगम पावू शकतात.
...............
महिलांचे सक्षमीकरण
ही राखी कोणत्याही कंपनीमध्ये नव्हे, तर घरकाम करणाऱ्या, नाका कामगार आणि महिला बचत गटांच्या माध्यमातून तयार केली जाते. महिलांना राखी बनवण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार आणि उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून दिले जात आहे. यामुळे पर्यावरणासोबत महिला सक्षमीकरणालाही हातभार लागतो.
................
केवळ ५० रुपये किंमत
बीज राखीची किंमत केवळ ५० रुपये असून, ती सेक्टर-१६, घणसोली येथील प्रभात ट्रस्टच्या कार्यालयात उपलब्ध आहे. सण साजरा करतानाच पर्यावरण रक्षण आणि समाजसेवा यांचा आदर्श या उपक्रमातून उभा राहिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.