देवखोप, कमारे धरणांतून पालघरसाठी पाणी आरक्षित करावे
पालघर, ता. २४ (बातमीदार) : नगर परिषद व २६ गाव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत मासवण धरणातून घेतले जाणारे पाणी शहरासाठी कमी पडत आहे. या योजनेसाठी देवखोप आणि कमारे धरणांतून जादा पाणी आरक्षित करावे, अशी मागणी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे उपनेते उत्तम पिंपळे यांनी पत्राद्वारे सरकारकडे केली आहे.
पालघर नगर परिषदेसह २६ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी योजना प्रत्यक्षात २०११ मध्ये सुरू झाली होती. पुढील २५ वर्षांचे नियोजन धरून या योजनेची आखणी व अंमलबजावणी करण्यात आली होती. त्यावेळेस या योजनेसाठी ५.४८ दलघमी पाणी मंजूर होते, मात्र त्यानंतर पालघर जिल्हा घोषित करण्यात आल्यावर नागरीकरणामुळे लोकसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. नगर परिषद क्षेत्रासह लगतच्या १८ गावांची पाणी समस्या गंभीर होत आहे. सद्य:स्थितीत पालघर परिसरामध्ये कमारे धरण तयार होत आहे. देवखोप लघु पाटबंधारे अस्तित्वात आहे. या दोन्ही धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. दोन्ही धरणांचे पाणी आरक्षण करण्यात आलेले नाही. त्यामुळे कमारे आणि देवखोप धरणांतून नगर परिषदेच्या २६ गाव पाणीपुरवठा योजनेकरिता अधिकचे पाणी मंजूर करावे, अशी मागणी उत्तम पिंपळे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. या वेळी माजी महापौर विशाखा राऊत, शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.