रानभाज्यांचे अस्तित्व धोक्यात

रानभाज्यांचे अस्तित्व धोक्यात

Published on

मुरबाड, ता. २७ (वार्ताहर) : मुरबाड तालुक्यातील ग्रामीण, आदिवासी पट्ट्यात व मुरबाड शहर परिसरात शेताच्या बांधावर नैसर्गिकरित्या रानभाज्या उगवतात. मात्र, शेतकरी बांधावरील गवत नियंत्रणासाठी घातक तणनाशकांची फवारणी करत असल्याने रानभाज्यांवर परिणाम होत आहे. परिणामी, सध्याच्या घडीला रानभाज्या मिळणे मुश्किल झाल्या आहेत.
पावसाळ्यात मेहनतीशिवाय शेताच्या बांधावर रानभाज्या आपोआप उगवतात. ऋतूमानानुसार रानभाज्या औषधी गुणधर्माचे काम मोठ्या प्रमाणात करतात. त्यामध्ये अनेक पोषकतत्त्वे आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात. ५०हून अधिक रानभाज्या उपलब्ध होतात; परंतु सध्या मजूर मिळत नसल्यामुळे गवतावर तणाक्षाची फवारणी हा सोपा उपाय शेतकरी अवलंबत आहेत. त्यांचा थेट परिणाम रानभाज्यावर होत आहे. काठेमाल, कुरडू, ढोल टाकळा, भारंगी या शेताच्या बांधावर यांसारख्या पोषणमूल्यांनी भरलेल्या रानभाज्या सहज मिळेनाशा झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे.

--------------------
मजुरांचा दुष्काळ व वाढलेली मजुरी त्यामुळे गवत काढणे जमत नाही. शेतकरी सोपा उपाय म्हणून तणानाशकाची फवारणी करतात; परंतु त्यामुळे दुर्मिळ व आरोग्यदायी रानमेवा नाहीसा होतो, याची जाणीव शेतकऱ्यांना करून देण्याची गरज आहे.
- ज्ञानेश्वर मुरबाडे, शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com