भरधाव वेगाचे तीन बळी

भरधाव वेगाचे तीन बळी

Published on

नवी मुंबई, ता. २७ (वार्ताहर) : खारघरच्या हिरानंदानी उड्डाणपुलावर ९ जुलै रोजी पहाटे घडलेल्या अपघातातील जखमी तरुणांपैकी आणखी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे अपघातातील मृतांची संख्या आता तीनवर गेली आहे.
मुंबईतील धारावी येथे राहणारे तरुण फिरण्यासाठी दुचाकीवरून लोणावळ्याला गेले होते. ९ जुलै रोजी खारघर येथील हिरानंदानी उड्डाणपुलावर पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या कारने त्याच्या स्कुटीला धडक दिली. या धडकेत एक तरुण पुलावरून खाली फेकला गेला, तर इतर चार दुचाकींनाही कारने धडक दिली. या अपघातात स्कुटीवरील गंभीर जखमी असलेल्या मानव यल्लफ्पा कुंचीकोरवे (२२) याचा मृत्यू झाला, तर सुभान शेख (२०), इस्तियाक अन्सारी (२१), नवीन रावा (२३), महेश गड्डे (२५), संकेत सिंग (२०), साहील कुंचीकोरवे (२१), मुकुल ऊर्फ लकी कोळी (२२), आशिषकुमार शाहु (२३) सागर देवल्ला (२३)समीर मोहम्मद (२०) यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान सागर देवल्ला, समीर मोहम्मद यांचाही मृत्यू झाला आहे.
---------------------------------
चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा
अपघातानंतर पळून गेलेल्या कारचालक वैभव डेरेविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. त्याचा मद्यपानाबाबतचा वैद्यकीय अहवाल आलेला नाही. न्यायालयाने चालकाचा जामीन अर्ज फेटाळल्याने न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आल्याचे खारघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय कांबळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com