
मुरबाड, ता. २६ (बातमीदार) : तालुक्यातील काळू नदीवर होणाऱ्या धरण प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बोगस घरांची नोंद करून घरपट्टी आकारल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार चौकशी सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत, २८ जुलै रोजी ठाणे येथे भोरांडे गावचे सरपंच वैभव सरोगदे व तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी लकीचंद पाटील यांची चौकशी होणार आहे.
मुरबाड तालुक्यातील काळू नदीवर धरण बांधल्यामुळे तालुक्यातील उदाळ डोह, भोरांडे, खुटल, चासोळे, चासोळे खुर्द, आंबिवली, जडई, न्याहाडी, फांगलोशी, वाकलवाडी, करपटवाडी, तळेगाव, जडई, खरशेत, उमरोली, फांगणे, ऐनाचीवाडी, वाकलवाडी ही १८ गावे व २३ वाड्या बुडीत क्षेत्रात येणार आहेत. तसेच २५९.५४ हेक्टर खासगी जमीन पाण्याखाली जाणार आहे एकूण ७८७ कुटुंबातील ३१६९ लोक बाधित होणार आहेत.
दुहेरी लाभासाठी नोंदी?
बुडीत क्षेत्रातील घरांना नुकसान भरपाई , नोकरी असे दुहेरी लाभ मिळत असल्याने गेल्या दोन वर्षांत या धरणाच्या बुडीत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नवीन घरांची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणात ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कमाई केल्याची चर्चा आहे. अशा तक्रारी झाल्याने ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तपासणीचे आदेश दिले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.