जेवणात तणनाशक मिसळून मुलींची हत्या
जेवणात तणनाशक
मिसळून मुलींची हत्या
शहापूरमधील घटना; आईला अटक
किन्हवली, ता. २७ (बातमीदार) : अस्नोलीतील तीन सख्ख्या बहिणींचा विषबाधेमुळे मृत्यू झाल्याच्या घटनेने वेगळेच वळण घेतले आहे. मुलींचा सांभाळ करण्यास असमर्थ ठरत असल्याने जन्मदात्या आईनेच जेवणात तणनाशक मिसळून या मुलींची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शनिवारी (ता. २६) रात्री उशिरा या कृत्याची कबुली दिल्यानंतर किन्हवली पोलिसांनी संध्या भेरे हिच्यावर गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे.
शहापूरमधील संदीप भेरे यांच्यापासून विभक्त होऊन संध्या भेरे ही तीन मुलींसह अस्नोली येथे माहेरी राहत होती. सोमवारी (ता. २१) तिच्या तिन्ही मुलींना विषबाधा झाल्याने त्यांना विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले होते. उपचारांदरम्यान काव्या (वय १०), दिव्या (८) यांचा मुंबईतील नायर रुग्णालयात, तर गार्गी (५) हिचा घोटी येथील एसएमबीटी रुग्णालयात मृत्यू झाला होता. याबाबत मुंबईतील आग्रीपाडा पोलिस ठाणे आणि एसएमबीटी रुग्णालय यांच्या माहितीवरून शुक्रवारी (ता. २५) आकस्मिक मृत्यूची नोंद किन्हवली पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. दरम्यान, पती संदीप भेरे यांनी पत्नी संध्या हिच्यावर संशय व्यक्त करून तिन्ही मुलींच्या घातपाताबाबत तक्रार दिली. त्यानंतर किन्हवली पोलिसांनी शनिवारी (ता. २६) संध्या हिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.