पावसाच्या विश्रांतीने बळीराजा जोमात

पावसाच्या विश्रांतीने बळीराजा जोमात

Published on

वाडा, ता. २८ (बातमीदार) : तालुक्यात गेल्या आठवडाभर सर्वत्रच वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत होता. शनिवार (ता. २६)पासून पावसाने अखेर काहीसी विश्रांती घेतली असून, त्याचा जोर कमी झाल्याने शेतकऱ्यांनी भातलावणीच्या कामाला पुन्हा जोमाने गती दिली आहे.

मागील आठवड्यात तालुक्यात सतत मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे सर्वत्रच पूरस्थिती निर्माण झाली होती. नदी-नाल्यांसह भातलावणीने शेतही तुडुंब भरून गेली असल्याने या कामात खंड पडला होता, मात्र शनिवारपासून आता पवसाचा जोर काहीसा कमी झाला असून, भातलावणीच्या कामाला वेग आला असल्याचे दिसत आहे.

गरवी भातशेतीची लागवड पावसाअभावी काही दिवस रखडल्याने शेतकरी चिंता व्यक्त करीत होता. निसर्गाच्या लहरीपणामुळे पावसाचा काही नेम राहिला नसल्याने अपार कष्ट करूनदेखील हातात पीक सापडेल की नाही याची शाश्वती नसते. वाडा तालुक्यात सध्या गरवी भातशेतीच्या तुलनेत हळवार भातशेती जास्त प्रमाणात केली जात आहे. यात मोठे क्षेत्र वनपट्ट्यात येत असून, रानमाळासह डोंगरदऱ्यातही मोठ्या प्रमाणावर हळवार भातपिकाची लागवड केली जाते.

हवामान खात्यावर नाराजी
हवामान खात्याने पालघर जिल्ह्यात शनिवारी (ता. २६) अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. अनेकांना महत्त्वाचे काम असतानादेखील प्रवास करणे टाळले होते, मात्र पावसाने प्रत्यक्षात गैरहजर राहून विश्रांती घेतली होती. हवामान खात्याचे भाकीत पुन्हा एकदा फसवे निघाल्याने नागरिकांकडून या हवामान खात्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com