बाजार समितीत निविदा घोटाळा, सर्वोच न्यायालयात तक्रार
बाजार समितीत निविदा घोटाळा, सर्वोच न्यायालयात तक्रार
जुईनगर, ता. २९ (बातमीदार) : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत निविदा घोटाळा झाल्याचा आरोप करत अनिल तिवारी यांनी सर्वोच न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ४० कोटींच्या रस्ते काँक्रीटीकरण कामात अनियमितता आणि कागदोपत्री फेरफार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याप्रकरणी शुक्रवार (ता. १) न्यायालयात सुनावणी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
नियमबाह्य पद्धतीने अपात्र ठेकेदारांना पात्र ठरवून निविदा दिल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. पात्र ठेकेदारांना प्रक्रियेतून बाहेर ढकलण्यात आले असल्याचा ठोस पुरावादेखील याचिकेसोबत जोडण्यात आल्याचे तिवारी म्हणाले आहेत. बाजार समितीमधील काँक्रीटीकरण कामाची निविदा प्रक्रिया सुरू असताना विविध ठेकेदारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले होते. निविदा प्रक्रियेत नियमबाह्य निर्णय घेणाऱ्या संबंधित सर्व घटकांवर कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या सुनावणीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
याचिकेत कारवाईची मागणी
राज्य सरकारसह मुंबई एपीएमसीचे सभापती, सचिव आणि इतर चार अधिकाऱ्यांविरोधात याचिका दाखल केल्याचे अनिल तिवारी यांनी सांगितले. याचिकेत सभापती, सचिव, मुख्य लेखाधिकारी व तीन अभियंते यांच्यावर कारवाईचीदेखील मागणी करण्यात आल्याचे अनिल तिवारी म्हणाले. दरम्यान, यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालयात बाजार समितीतील घोटाळा प्रकरणाविरोधात तक्रार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.