पाणीटंचाईमुळे आता थेट मुंबईत धडक

पाणीटंचाईमुळे आता थेट मुंबईत धडक

Published on

खारघर, ता. ३० (बातमीदार) : तळोजा वसाहतीत १५ दिवसांपासून अपुरा पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. सिडको प्रशासनाकडे अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही ठोस उपाययोजना केली जात नसल्याने तळोजा सोसायटी फेडरेशनच्या वतीने ७ ऑगस्टला सिडकोच्या मुंबई येथील नरिमन पॉइंट कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
तळोजा फेज एक आणि दोनमध्ये वर्षांपासून पाणी समस्या कायम आहे. सिडकोने पाणी समस्या दूर करण्यासाठी फेज एक आणि दोनमध्ये जलकुंभ उभारले, मात्र समस्या ‘जैसे थे’आहे. अशातच पाणी समस्यासाठी वर्षानुवर्षे आंदोलने करून पाणीप्रश्न सुटत नसल्याने तळोजा सोसायटी फेडरेशनच्या सदस्यांनी सिडकोच्या नरिमन पॉइंट कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे.
------------------------------------
सिडकोविरोधात रोष
काही दिवसांपूर्वी फेज एक वसाहतीमधील अनेक सेक्टरमध्ये नवीन व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली, मात्र पाणी समस्या काही दूर झाली नाही. त्यात १५ दिवसांपासून तळोजा वसाहतीत कमी आणि अपुरा पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. सिडको प्रशासनाकडे अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही ठोस उपाययोजना केली नाही. तळोजावासीयांना पुरेसे पाणी मिळावे, यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे फेडरेशनचे अध्यक्ष प्रसाद पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com