तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांची धडक
बोर्डी, ता. ३० (बातमीदार) : गेल्या खरीप हंगामातील नुकसानभरपाई लवकरात लवकर नुकसानग्रस्तांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन झाई, बोरीगाव, ब्राह्मणगाव परिसरातील शेतकरी बागायतदारांनी तलासरी तालुका कृषी अधिकारी व तहसीलदारांना दिले.
२०२४ च्या खरीप हंगामात नैसर्गिक आपत्ती, वादळी वारे, अतिवृष्टीमुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊन बागायतदार, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला होता. शेतकऱ्यांनी सरकारकडे तगादा लावल्यानंतर कृषी विभागामार्फत पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी अर्थसाह्य करावे, असा निर्णय घेण्यात आला होता, मात्र वर्ष उलटून गेल्यानंतरही भरपाईचा निधी संबंधित खात्याकडून शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग न झाल्यामुळे प्रचंड नाराजी पसरली आहे. मागील चार महिन्यांपासून वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित खात्याकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे अखेर परिसरातील बागायतदारांनी बुधवारी (ता. ३०) सकाळी तलासरी येथील तालुका कार्यालयात धडक मारून तहसीलदार, कृषी अधिकारी यांना निवेदन सादर केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.