भावरपाड्यावरील वाट चिखलाची : रस्ता नसल्याने ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांची आबाळ
शिक्षणाची वाट चिखलातून
भावरपाड्यावर रस्ता नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल
विक्रमगड, ता. ३० (बातमीदार) ः विक्रमगड तालुक्यातील गावपाड्यांवर आजही रस्ता नसल्याने लोकांचे हाल होत असून, शाळकरी विद्यार्थ्यांसह रुग्णांना याचा मोठा फटका सहन करावा लागतो. दादडे ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या भावरपाडा येथील रहिवाशांची अशीच अवस्था आहे. चिखलाच्या वाटेने प्रवास करून येथील स्थानिक मेटाकुटीला आले आहेत.
विक्रमगडमधील दादडे (कपाडा) ते भावरपाडा या रस्त्यावर अक्षरशः चिखल झाला आहे. या चिखलातून वाट काढून विद्यार्थी व स्थानिक बेजार झाले आहेत. पंचायत समितीकडून प्रकल्प अधिकाऱ्यांना २०२३ मध्ये ठक्कर बाप्पा आदिवासी योजनेंतर्गत या रस्त्याचे काम मंजूर करण्यासाठीचे पत्र दिले होते; मात्र आजपर्यंत प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही. यासंबंधी ग्रामपंचायतीला निवेदन देऊन रस्त्याच्या काँक्रीटीकरणाची मागणी केली आहे. तसेच तातडीने कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा स्थानिकांकडून देण्यात आला आहे.
रस्त्याअभावी मृत्यू
रस्त्याअभावी २००९ मध्ये पूनम बंदू भवर हिला सर्पदंश झाला होता; मात्र रस्ता नसल्याने डोलीने तिला दवाखान्यात नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला होता. भविष्यात अशा घटना होऊ नयेत, यासाठी येथील ग्रामस्थांनी रस्त्याची मागणी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.