- दीड वर्षात १ कोटी २० लाख वाहनांचा प्रवास
अटल सेतूला कारचालकांची पसंती!
दीड वर्षात सुमारे १.३१ वाहनांची ये-जा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : मुंबई आणि नवी मुंबईदरम्यानचा प्रवास अधिक गतिमान करणाऱ्या अटल सेतूला मुंबईकर कारचालकांची मोठी पसंती मिळत आहे. दीड वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या सेतूवरून आतापर्यंत तब्बल एक कोटी ३१ लाख वाहनांनी प्रवास केला आहे. त्यामध्ये सर्वाधिक १.२० कोटी म्हणजे सुमारे ९१ टक्के चारचाकी कारचा समावेश आहे.
मुंबईला नवी मुंबईशी जोडण्यासाठी एमएमआरडीएने तब्बल २२ किलोमीटरचा देशातील सर्वात लांबीचा सागरी सेतू उभारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पित झालेला हा सेतू १३ जानेवारी २०२४ पासून सेवेत आला आहे. तेव्हापासून २४ जुलैपर्यंत एकूण एक कोटी ३१ लाख ६३ हजार १७७ वाहनांनी या पुलावरून प्रवास केला आहे. त्यात सर्वाधिक चारचाकी गाड्यांची संख्या असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणच्या दिशेने जाणाऱ्या वाहनधारकांकडून वाशी खाडीपुलाऐवजी अटल सेतूला पसंती मिळत आहे.
--------
सेतूवरून धावलेली वाहने
एकूण वाहने : १ कोटी ३१ लाख ६३ हजार १७७
चारचाकी कार : १ कोटी २० लाख ८६ हजार ७६
मिनी बस : १ लाख ७१ हजार ७११
बस/डबल ॲक्सल ट्रक : २ लाख २ हजार ८६४
मल्टी ॲक्सल वाहने : ७ लाख ९८९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.