गणेशोत्सवासाठी रेल्वेचा मोठा दिलासा!
गणेशोत्सवासाठी रेल्वेचा मोठा दिलासा!
आणखी ४४ अनारक्षित मेमू गाड्या
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना यंदा रेल्वेने मोठा दिलासा दिला आहे. यापूर्वी जाहीर केलेल्या २५० विशेष गाड्यांव्यतिरिक्त मध्य रेल्वेने आणखी ४४ अनारक्षित मेमू गाड्यांची घोषणा केली आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी धावणाऱ्या विशेष गाड्यांची एकूण संख्या २९६वर पोहोचली आहे.
दिवा-चिपळूणदरम्यान मेमू गाड्यांच्या विशेष फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. एलटीटी-सावंतवाडी मार्गावर आठ विशेष गाड्या धावणार आहेत. यामध्ये रेल्वे क्रमांक ०११३१ गाडी एलटीटीहून २८, ३१ ऑगस्ट आणि ४, ७ सप्टेंबर रोजी सकाळी ८.४५ वाजता सुटेल आणि त्या रात्री १०.२० वाजता सावंतवाडीस पोहोचेल. परतीसाठी रेल्वे क्रमांक ०११३२ गाडी सावंतवाडीतून त्याच तारखांना रात्री ११.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १२.३० वाजता एलटीटी येथे पोहोचेल.
दिवा-खेडदरम्यान ३६ फेऱ्या
रेल्वे क्रमांक ०११३३ मेमू २२ ऑगस्ट ते ८ सप्टेंबरदरम्यान दररोज दुपारी १.४० वाजता दिवा येथून सुटून रात्री ८ वाजता खेड येथे पोहोचेल. परतीला रेल्वे क्रमांक ०११३४ मेमू २३ ऑगस्ट ते ९ सप्टेंबरदरम्यान रोज सकाळी ८ वाजता खेडहून सुटून दुपारी एक वाजता दिव्याला पोहोचेल. याशिवाय रेल्वे क्रमांक ०११५५/०११५६ दिवा-चिपळूण-दिवा मेमू गाड्यांचे २२ ऑगस्ट ते १० सप्टेंबरदरम्यान दोन अतिरिक्त फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.