३६ वर्षांपूर्वींच्या आठवणींने हळहळ

३६ वर्षांपूर्वींच्या आठवणींने हळहळ

Published on

३६ वर्षांपूर्वींच्या आठवणींने हळहळ
करंजातील धीरज कोळीच्या कुटुंबावर दुःखाचे सावट
उरण, ता.३१ (वार्ताहर)ः अलिबाग जवळ बोट दुर्घटनेत उरण येथील धीरज कोळीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ३६ वर्षांपूर्वी धीरजच्या वडिलांचा अशाच प्रकारे मृत्यू झाला होता. त्यामुळे दोन्ही घटनांच्या आठवणीने कुटुंबावर दुःखाचे सावट पसरले आहे.
उरण तालुक्यातील करंजा येथील ‘तुळजाई’ बोटीचा अपघात होऊन तीन खलाशांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी सकाळी अलिबागच्या समुद्रकिनारी त्यांचे मृतदेह आढळून आले होते. यामध्ये, करंजातील ३८ वर्षीय धीरज कोळीचा पण समावेश आला. दोन वर्षांपासून धीरज बोटीवर खलाशी म्हणून काम करीत होता. धीरज आणि त्याचा भाऊ सचिन हे दोघे कुटुंबाला आर्थिक सहाय्य करीत होते. मात्र, २६ जूलै रोजी खांदेरी येथे तुळजाई बोट बुडाल्याने धीरजचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे ३६ वर्षांपूर्वी वादळामुळे झालेल्या दुर्घटनेच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत.
---------------------------------------------------
भावावर कुटुंबाची जबाबदारी
रायगडच्या पश्चिम किनारपट्टीवर २३ जुलै १९८९ साली आलेल्या वादळामुळे लाटांच्या प्रवाहात मासेमारीला गेलेल्या अनेक बोटी बुडाल्या होत्या. यावेळी बोटींवरील दोनशे पेक्षा अधिक मच्छीमारांचा मृत्यू झाला होता. त्यात करंजा गावातील २५ पेक्षा अधिक मच्छिमारांसह धीरजचे वडील काशिनाथ कोळी यांचाही समावेश होता. यावेळी, त्यांच्या परिवारात धीरज, भाऊ, बहीण आणि आईचा समावेश होता. पण आता धीरजच्या मृत्यूनंतर त्याच्या भावावर कुटुंबाची जबाबदारी आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com