कांदिवलीत धोकादायक पदपथ
कांदिवलीत धोकादायक पदपथ
चिखल साचल्याने विद्यार्थ्यांची कसरत
कांदिवली, ता. २ (बातमीदार) ः कांदिवली पश्चिम-पूर्व जोडणाऱ्या हुतात्मा राजगुरू उड्डाणपुलाला एका बाजूने पदपथ आहे. चार फूट रुंदीच्या पदपथावर पावसाळ्यात चिखलगाळासह पाणी साचते. प्रवाशांना विशेषतः पालक आणि विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करीत प्रवास करावा लागत आहे. काही प्रवासी जीव धोक्यात घालून रहदारीच्या मार्गांवरून जातात. पालिकेने प्रवासासाठी एकमेव असलेल्या पदपथाची योग्य डागडुजी करावी, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.
येथील उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात रहदारी असते. या परिसरातील शाळांमध्ये जाण्यासाठी विद्यार्थ्यांना उड्डाणपुलावरील पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारा एकमेव अरुंद पदपथ आहे. त्यामुळे या पदपथाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. मात्र पदपथावर निकृष्ट पद्धतीने काम केले असल्याचा आरोप होत आहे. पदपथ मध्यभागी खोलगट असल्याने पावसाचे पाणी साचते. चिखल गाळदेखील जमा होतो. त्यामुळे शाळेतील लहान मुलांना, पालकांना अशा चिखलगाळातून वाट काढत जावे लागते. पालिका अधिकाऱ्यांनी तातडीने डागडुजी करून पदपथावर चिखलगाळ, पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.