भर पावसाळ्यात नारपोली-देवजीनगरमध्ये पाणीटंचाई
भिवंडी, ता. २ (वार्ताहर) : मे महिन्यापासून पावसाळा सुरू असूनही नारपोली व देवजीनगर परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्याच्या या समस्येकडे भिवंडी पालिका पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत आहे. यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस (अजित पवार गट)चे प्रदेश सरचिटणीस अजित झा यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
नारपोली देवजीनगर परिसरातील नागरिक आठवड्यातून केवळ एक-दोन वेळा येणाऱ्या पाण्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे महिलांना लांबवरून पाणी आणावे लागते. नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पालिका आयुक्त अनमोल सागर यांची शुक्रवारी (ता. १) भेट घेऊन अजित झा यांनी पाण्याच्या समस्येचा सविस्तर पाढा त्यांच्यासमोर मांडला. तक्रारी व निवेदने देऊनही पाणीपुरवठा सुरळीत झाला नसल्याने पालिका प्रशासनाचा निषेध नोंदवत झा यांनी लवकरात लवकर पाणी प्रश्न सोडवला नाही, तर मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही दिला आहे. या भागातील नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी असून, प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.