महावितरणविरोधात प्रहार जनशक्तीचे आंदोलन
उल्हासनगर, ता. २ (बातमीदार) : महावितरणच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याच्या निषेधार्थ उल्हासनगरातील प्रहार जनशक्ती पक्षाने भरपावसात ठिय्या आंदोलन करून अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. या वेळी चार दिवसांनी समस्या सोडवण्याचे लेखी आश्वासन अधिकाऱ्यांनी प्रहारचे ठाणे जिल्हाध्यक्ष ॲड. स्वप्नील पाटील, शहराध्यक्ष प्रधान पाटील यांना दिले.
कॅम्प नंबर ४ आणि ५ परिसरात महावितरणच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. विजेच्या लपंडावामुळे नागरिकांचा रोजगार बुडाला आहे. व्यापार ठप्प झाल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे पाणी येण्याची वेळ आणि वीजपुरवठा खंडित होण्याची वेळ एकच असल्याने नागरिकांना पाणी मिळत नाही. अव्वाच्या सव्वा वीजबिल देऊन वीजग्राहकांची आर्थिक लूट होत आहे. विशेष म्हणजे स्मार्ट मीटर नागरिकांच्या विनापरवाना बसविण्यात येत आहे. याबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी वाढल्या होत्या. अखेर स्वप्नील पाटील आणि प्रधान पाटील यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी एकत्र येत आकाश कॉलनी येथील महावितरणच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. या वेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी चार दिवसांत निवेदनात मांडलेले सर्व विषयांवर तोडगा काढू, असे आश्वासन दिल्यावर आंदोलनाची सांगता करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.