स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात पथदिवे लावण्यासाठी सरकारची समिती

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात पथदिवे लावण्यासाठी सरकारची समिती

Published on

पथदिवे लावण्यासाठी सरकारची समिती
मुंबई, ता. ३ : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात पथदिवे लावण्याची जबाबदारी संबंधित संस्थेची आहे. ते लावताना त्याची किंमत, दर्जा आणि वीजबिलाच्या बचतीचा विचार करता कोणत्या स्वरूपाचे पथदिवे लावले जावेत, याबाबतचा अभ्यास करण्यासाठी आणि पुरवठादार निश्चित करण्यासाठी राज्य सरकारने नगर परिषद प्रशासन संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे.
राज्य सरकारच्या ऊर्जा संवर्धन धोरणानुसार, पथदिवे बसविताना केवळ एलईडी पथदिवे बसविणे बंधनकारक आहे. राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात ‘एनर्जी इफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड’च्या (ईईएसएल) माध्यमातून एलईडी पथदिवे बसविण्यासाठी नगरविकास विभागामार्फत केलेला सात वर्षांचा करार संपला आहे. त्यामुळे राज्यातील पथदिवे यंत्रणा प्रभावीपणे कार्यान्वित राहण्यासाठी पथदिवे यंत्रणेच्या दरांमध्ये आणि कामाच्या दर्जात एकसूत्रता असावी, यासाठी पुरवठादार निश्चित करण्यासाठी समिती नेमली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com