वसई-विरारमधील चार उड्डाणपुलांना रेल्वेकडून मान्यता

वसई-विरारमधील चार उड्डाणपुलांना रेल्वेकडून मान्यता

Published on

वसई-विरारमधील चार उड्डाणपुलांना रेल्वेकडून मान्यता
आजी-माजी आमदारांमध्ये श्रेयवाद
विरार, ता. ७ (बातमीदार) ः वसई-विरार महापालिका क्षेत्रातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रेल्वेमार्गावर उमेळमान, अलकापुरी, ओसवाल नगरी आणि विराट नगर येथे प्रस्तावित चार उड्डाणपुलांच्या आराखड्याला रेल्वे प्रशासनाने मंजुरी दिली आहे. मात्र, याच्या श्रेयवादावरुन आता आजी-माजी आमदारांच्या समर्थकांमध्ये चांगलीच जुंपली आहे.
वसई विरारच्या वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने उमेळमान, अलकापुरी, ओसवाल नगरी आणि विराट नगर येथे रेल्वे उड्डाणपूल बांधावेत, असा प्रस्ताव माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी रेल्वे मंत्रालयास दिला होता. यासाठी हितेंद्र ठाकूर यांनी केंद्र शासन आणि रेल्वे मंत्रालयाकडे या उड्डाणपुलांच्या मंजुरीसाठी पाठपुरावा केला होता. पण, या पुलांना आमच्या पाठपुराव्यामुळे मान्यता मिळाल्याचा दावा नालासोपाराचे आमदार राजन नाईक आणि वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी केला आहे. यामुळे आजी-माजी आमदारांच्या समर्थकांमध्ये समाज माध्यमांवर चांगलेच युद्ध रंगल्याचे चित्र दिसत आहे.
याबाबत हितेंद्र ठाकूर हे सातत्याने प्रयत्न करत होते, असा सूर त्यांच्या समर्थकांचा आहे. तर नुसती मागणी करून अथवा पत्र देऊन कामे मंजूर होत नाहीत. त्यासाठी पाठपुरावा करावा लागतो, असे वसई आणि नालासोपाराच्या आमदारांच्या समर्थकांचे म्हणणे असल्याने हा श्रेयवाद आगामी पालिका निवडणुकीपर्यंत चांगलाच रंगणार असल्याचे दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com