पाणी , रस्ते , कोंडीने शहरवासीय  ग्रासले

पाणी , रस्ते , कोंडीने शहरवासीय ग्रासले

Published on

पाणी, रस्ते, कोंडीने शहरवासीय ग्रासले
बविआची वसई विरार महापालिकेत धाव
वसई, ता. ७ (बातमीदार) ः वसई विरार शहरात मागील पाच वर्षापासून प्रशासकीय राजवट आहे. परंतु, नागरिकांना सद्यस्थितीत पाणी, घनकचरा, रस्ते व कोंडीने ग्रासले असताना बहुजन विकास आघाडी पक्षाने वसई-विरार शहर महापालिकेच्या प्रशासकांकडे धाव घेतली आहे. यावेळी शहरातील अपूर्ण कामांना गती देण्याची मागणी त्यांनी केली.
बहुजन विकास आघाडीचे संघटक-सचिव तथा स्थायी समितीचे माजी सभापती अजीव पाटील व माजी सभापती पंकज ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने वसई-विरार महापालिकेचे आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांची भेट घेतली. शहरातील वाहतूक कोंडी, रस्तेदुरुस्ती, नळजोडणी वितरण, तलाव आणि उद्यानांचे सुशोभीकरणासह प्रस्तावित कामे यासह अन्य विषयांवर चर्चा केली.
बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष तथा माजी आमदार हितेंद्र ठाकूर, माजी आमदार क्षितिज ठाकूर, माजी महापौर राजीव पाटील यांच्या मार्गदर्शनातील या शिष्टमंडळात स्थायी समिती माजी सभापती अजीव पाटील, माजी सभापती पंकज ठाकूर, प्रशांत राऊत, सखाराम महाडिक, रंजन पाटील, यासह माजी नगरसेवक-नगरसेविका आदींचा समावेश होता. यावेळी आयुक्तांनी समस्या जाणून घेतल्या व त्यावर लवकरच उपायोजना करण्यात येतील, असे शिष्टमंडळाला आश्वासित करण्यात आले.

उड्डाणपुलाजवळ कोंडी
मागील काही दिवसांपासून विरार-पूर्व पश्चिमेला जोडलेल्या उड्डाणपुलाजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे वाहन धारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून वेळ, इंधनाचाही मोठा अपव्यय होतो. त्यामुळे वाहतूक कोंडी दूर करण्याकरता आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिष्टमंडळाने यावेळी केली.

पाणी आले मात्र नळजोडणीचे काय?
एमएमआरडीच्या सूर्या पाणीपुरवठा योजनेतून वसई-विरार महापालिकेला अतिरिक्त १८५ एमएलडी पाणी उपलब्ध झालेले आहे. परंतु पाण्याची आवश्यकता असलेल्या अनेक इमारतींना अद्याप नळजोडणी वितरित केलेल्या नाहीत. त्यामुळे रहिवासी संकुलात पाण्याची समस्या भेडसावत आहे. नळजोडण्यांचे वितरण व अपूर्ण जलकुंभांची कामे तातडीने केली गेल्यास शहरवासियांना दिलासा मिळू शकेल याबाबत आयुक्तांना विनंती केली.

नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या तसेच प्रस्तावित असलेली कामे याबाबत आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांच्याशी चर्चा करण्यात आली. वाहतूक कोंडी, नळजोडणी वितरण, घनकचरा तसेच रस्ते दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली.
- अजीव पाटील, माजी सभापती, स्थायी समिती

वसई : बविआ शिष्टमंडळआयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांची भेट घेतांना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com