मुंबईच्या किनाऱ्यांवर नारळीपौर्णिमेचा उत्साह
मुंबईच्या किनाऱ्यांवर नारळी पौर्णिमेचा उत्साह
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : मुंबईच्या कोळीवाड्यात आज शुक्रवारी (ता. ८) नारळी पौर्णिमेचा सण उत्साहात साजरा झाला. समुद्राची पूजा करून कोळीबांधवांनी नारळ अर्पण केला. मासेमारीसाठी समुद्राला शांत करण्यासाठी प्रार्थना केली. खार कोळीवाड्यात सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांनी विशेष उपस्थिती लावली. कोळीबांधवांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
कोळीबांधव पारंपरिक वेशभूषेत नटून सजून आले होते. त्यांनी पारंपरिक गाणी व नृत्ये सादर केली. गावात मिरवणूक निघाली. आशीष शेलार यांच्यातर्फे ‘बिग बॉस’फेम तसेच कोळी गीतांचे बप्पी लहरी दादूस यांचा ऑर्केस्ट्रा समुद्रकिनारी आयोजित करण्यात आला होता. त्याचा स्थानिक नागरिकांनी मनसोक्त आनंद लुटला. आशीष शेलार यांनीही कार्यक्रमाचा आनंद लुटला. त्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. शेलार यांनी कोळीबांधवांना शुभेच्छा देताना सांगितले, की ‘सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रभर १,२०० कार्यक्रम घेतले जाणार आहेत. ज्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल.’ ‘आमचा उदरनिर्वाह हा समुद्रावर अवलंबून आहे, म्हणून आम्ही आम्हाला सागरपुत्र मानतो. दोन-तीन महिने आमचा समाज घरीच असतो,’ असे खार कोळीवाड्याचे सदस्य मनोज कोळी यांनी सांगितले. दरम्यान, मुंबईच्या कुलाबा बधवार पार्कमध्येही नारळी पौर्णिमा साजरी केली गेली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.