आम्हावरील संकट दूर करून  धंद्यात बरकती दे,

आम्हावरील संकट दूर करून धंद्यात बरकती दे,

Published on

आम्हावरील संकट दूर करून धंद्यात बरकती दे
कोळीबांधवांनी खोल समुद्रात नारळ केले अर्पण
उरण, ता. ९ (वार्ताहर) ः आम्हावरील संकट दूर कर, धंद्यात बरकत दे यासाठी कोळीबांधवांचा आजचा महत्त्वाचा सण असलेल्या नारळी पौर्णिमा दिवशी कोळीबांधवांनी खोल समुद्रात जाऊन नारळ अर्पण केले.
नारळी पौर्णिमा हा कोळीबांधवांचा विविध सणांपैकी एक महत्त्वाचा सण आहे. नारळी पौर्णिमेनंतर समुद्र शांत होतो. यानंतरच खोल समुद्रात मच्छीमारी करण्यासाठी कोळीबांधव जातात. त्यामुळे कोळीबांधवांवर कोणतेही अरिष्ट येऊ नये यासाठी आणि समुद्राला शांत करण्यासाठी या बांधवांकडून नारळ अर्पण केला जातो. यानिमित्त गव्हाण, मोरा, करंजा दिघोडे आदी भागातून कोळीबांधवांकडून समुद्रात नारळ अर्पण केले.
हा परंपरागत आम्हा कोळीबांधवांचा सण आम्ही दरवर्षी साजरा करतो. आमचा उदरनिर्वाह समुद्रावरच होतोय. हा समुद्र आमच्यासाठी पूजनीय आहे. आम्हा कोळीबांधवांवर मासेमारीदरम्यान कोणतेही आरिष्ट येऊ नये यासाठी समुद्राची पूजा करतो, असे करंजा येथील मार्तंड नाखवा यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com