गोरेगावात सात वर्षापूर्वी बांधलेला वीर सावरकर पूल पाडणार
गाेरेगावातील पूल सात वर्षांतच पाडणार?
मुंबई, ता. १० : ‘गोरेगाव येथील सात वर्षांपूर्वी बांधलेला स्वातंत्र्यवीर सावरकर पूल वर्सोवा-दहिसर किनारी मार्गासाठी पाडण्यात येणार आहे. यावर २७ कोटी रुपये खर्च करण्यात आला हाेता. हा पूल पाडल्यामुळे पर्यायी रस्ता तयार होईपर्यंत वाहतूक कोंडीचा फटका बसणार आहे. मुंबईकरांनी भरलेल्या कराच्या पैशांचा हा अपव्यय आहे,’ असा आरोप भाजपचे नेते रवी राजा यांनी केला आहे.
गोरेगाव परिसरातील वीर सावरकर पूल सात वर्षांपूर्वी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बांधण्यात आला होता. पुलाच्या पाडकामामुळे केवळ आर्थिक नुकसानच नव्हे; तर पर्यायी रस्ता उपलब्ध होईपर्यंत वाहतूक काेंडीचा प्रचंड त्रास सहन करावा लागणार आहे. नियोजनाचा अभाव हा या परिस्थितीमागील मुख्य मुद्दा असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. मुंबईत ‘एमएमआरडीए’सारखी नियोजन संस्था आहे. त्यात मुंबई महापालिकेचाही प्रतिनिधी असतो. तरीदेखील भविष्यातील प्रकल्प आणि त्यांचा शहराच्या रचनेवर व नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम याचा विचार का होत नाही, असा सवालही रवी राजा यांनी उपस्थित केला आहे. वीर सावरकर पुलाच्या बाबतीत नियोजनातील त्रुटीचे आणि सार्वजनिक निधीच्या अपव्ययाचे ठळक उदाहरण असल्याचे नागरिकांचे मत आहे. या प्रकारामुळे मुंबईकरांत नाराजी व्यक्त केली जात आहे.
...
अंतिम निर्णय झालेला नाही!
‘दहिसर कोस्टल मार्गासाठी जुना पूल पाडावा लागणार आहे. त्यामुळे कोस्टल रोडला अडथळा तयार होत आहे. तो पूल ठेवून जर डबल डेकर कोस्टल रोड बनवला, तर त्यासाठी पदपथांवर पिलर बनवावे लागतील, जे लोकांना अडचण निर्माण करू शकतात. यामुळे सध्याचा पूल पाडून कोस्टल रोड बनवण्याचा प्रस्ताव आहे. त्यावर अजूनतरी अंतिम निर्णय झालेला नाही,’ असे महापालिकेच्या पूल विभागाचे प्रमुख उत्तम श्रोते यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.