कल्याण शीळ रोडवर मेट्रोच्या कामासाठी २० दिवस रात्रीच्या वेळेत वाहतूक बदल

कल्याण शीळ रोडवर मेट्रोच्या कामासाठी २० दिवस रात्रीच्या वेळेत वाहतूक बदल

Published on

कल्याण-शिळ रोडवर रात्रीचा वाहतूक बदल
मेट्रोच्या कामासाठी २० दिवस निर्णय लागू
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ११ : कल्याण-शिळ रोडवर मेट्रोच्या काँक्रीट खांबांवर तुळया (गर्डर) ठेवण्याचे काम करण्यात येणार आहे. ११ ते ३० ऑगस्टदरम्यान तीन टप्प्यांत कामे करण्यासाठी शिळ रोडवर रात्री पावणेबारा ते पहाटे पाच वाजेपर्यंत वाहतूक बदल केल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी अधिसूचनेद्वारे दिली आहे. कल्याण-शिळ रोड हा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून, पत्री पूल ते रूणवाल चौक या परिसरात मेट्रो १२ या प्रकल्पाचे काम सुरू आहे. एमएमआरडीएतर्फे गवार कंस्ट्रक्शन कंपनीकडून मेट्रो मार्गाची कामे सुरू आहेत.

गर्डर ठेवण्यासाठी वाहतूक बदल

११ ते २० ऑगस्ट, मानपाडा चौक ते सोनारपाडा चौक
कल्याण-शिळ रस्त्याने कल्याणकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना मानपाडा चौक येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने मानपाडा चौक येथे डावे वळण घेऊन सेवा रस्त्याने सोनारपाडा चौक येथे जाऊन तेथून कल्याण-शिळ रस्त्यावरील नियमितच्या मार्गिकितून धावतील.

२१ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट, सुयोग रिजन्सी अनंतम
कल्याण डोंबिकलीकडून सुयोग हॉटल, रिजन्सी अनंतम प्रवेशद्वार चौक येथून शिळफाटा, मानपाडा जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना सुयोग हॉटेल, रिजन्सी अनंतम चौक येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने सुयोग हॉटेल, रिजन्सी अनंतम चौक येथून खांब क्रमांक ११० येथून उजवीकडे वळण घेऊन कल्याणकडे येणाऱ्या मार्गिकेवरून खांब क्रमांक १२८ व्यंकटेश पेट्रोलपंपासमोरून डावे वळण घेऊन नियमितच्या शिळ मार्गिकेतून पुढे जातील.

शिळ, मानपाडा रस्त्याने कल्याणकडे येणाऱ्या वाहनांना सोनारपाड्यातील डोंबिवली नागरी सहकारी बँक चौक (डीएनएस) येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने डीएनएस चौकातून खांब क्रमांक १४४ येथून सेवा रस्त्याने सुयोग हॉटल रिजन्सी अनंतम चौक येथून कल्याण रस्त्याने इच्छित स्थळी जातील. अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना यामधून मोकळीक देण्यात आली आहे.
...................
काेट
कल्याण-शिळ रोड परिसरात ट्रॅफिक कोंडीने नागरिक हैराण झाले आहेत. अशा वेळी १४ ते ३० ऑगस्टदरम्यान गर्डर बसवण्याचे काम व डायव्हर्शन सुरू केल्यास ही परिस्थिती आणखी गंभीर बनेल. गणेशाेत्सव हा देशातील सर्वात मोठा उत्सव आहे. त्यामुळे उत्सव संपल्यानंतर काम हाती घ्यावे, अशी जनतेची एकमुखाने केलेली जनहिताची मागणी आहे.
- राजू पाटील, नेते, मनसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com