१० गावांमध्ये संतापाची लाट

१० गावांमध्ये संतापाची लाट

Published on

रोहा, ता. १२ (बातमीदार)ः तालुक्यातील ११९ गावांचा पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. या निर्णयामुळे चिल्हे, देवकान्हे, खांब भागातील शेतकऱ्यांनी प्रशासनाला निवेदनद्वारे विरोध दर्शवला आहे, तर आणखी १० गावांतील संतप्त ग्रामस्थांनी संघटित होताना प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला आहे.
पर्यावरण संवेदनशील क्षेत्राला विरोध असल्याचे लेखी निवेदन मंगळवारी (ता. १२) धामणसई विभागातील १० गावांतील ग्रामस्थांनी रोहा प्रांताधिकारी, वन उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदारांकडे निवेदनातून दिले आहे. पर्यावरण संवेदनशील क्षेत्राविरोधाच्या आंदोलनात पिंगळसई, वांदोली, मढाळी, सोनगाव, गावठाण, धामणसई, मालसई, मूठवली, सांगडे, उडदवणे गावातही संतापाची लाट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com